Skip to main content

“माणुसकी – मनाला स्पर्श करणारी कथा”

माणुसकी

➖➖➖➖➖➖➖➖➖


“माणुसकी आणि करुणा यांवर आधारित मराठी कथा, संकटातही माणुसकी जपणाऱ्या व्यक्तिरेखांची हृदयस्पर्शी कहाणी”



रात्रीचे नऊ वाजलेले पाहून जफरभाईंनी आपल्या पोराला, आसिफला, हाक दिली…

“ओ आसिफ… चल गाडीयां अंदर लगा.”

आसिफ मित्रासोबत गप्पा मारत होता. मित्राला _“चल उद्या सकाळी कॉलेजात भेटू”_ म्हणत त्यानं कटवलं व दुरुस्तीला आलेल्या गाड्या आत दुकानात एका बाजूला एक लावू लागला.

बारा बाय दहाच्या दुकानात पाच सहा गाड्या बसवायची कसरत रोज करायला लागायची. पण गिर्‍हाइकाच्या  गाड्या बाहेर ठेवून चालणार नाही, हे त्यालाही ठाऊक होतं. त्यात बारीक पाऊस चालू झाला होता.

गाड्या लावून होईपर्यंत जफरभाईंनी सगळं सामान आत ठेऊन दिलं. हात धुतले व पोराकडे पाहिलं… त्यांना बरं वाटलं.

_‘आपण नशीबवान… पोरगं कॉलेज शिकतंय आणि धंद्यात पण आपल्याला मदत करतंय. नाहीतर आपल्या भावांची पोरं… सगळीजण गॅरेजच्या कामात… पण दहावीच्या पुढे एकपण शिकला नाही.’_

पाऊस आता वाढला होता. अजून वाढण्याआधी घरी पोहोचणं आवश्यक होतं.

दुकानाचं शटर ओढून कुलूप लावून जफरभाई वळणार, तोच एक तरुण जोडपं गाडी ढकलत त्यांच्या दरवाज्याशी आलं. बाइकवर आधीच जाऊन बसलेला आसिफ लगेचच म्हणाला,

_“दुकान बंद हुआ भाई…!”_

जफरभाईंनी आसिफकडे फक्त एक कटाक्ष टाकला.
त्यांनी समोर येत त्या जोडप्याला विचारलं,

_“काय झालं गाडीला?”_

तरुण सायलेन्सरकडे बोट दाखवत म्हणाला, _“गावातनं निगालो तवाच जरा गचके मारत होती… मिस्त्रीला दावायला वेळ नवता… जरा इमरजन्शी झाल्या…”_  बायकोकडे हात दाखवत तो म्हणाला, _“हिच्या गावी दत्तवाडला निगालतो… पण इथं नाक्यापर्यंत कसंतरी आलो आणि गाडी बंद पडली. तीन किलोमीटर ढकलत आणलीय… लवकर पोचायचय. हिचे आबा… म्हंजी वडील… लई शिरीयस हायेत. बघा जरा काही होतंय का काही करुन चालू…”_

जफरभाईंनी तरुणीकडे पाहिलं. तिच्या चेहर्‍यावरचे भावच सर्व सांगून गेले. त्यानं दोघांना छपराखाली आडोशाला घेतलं.

_“बघू…”_ म्हणत त्यानी बाईक स्टँडला लावून चेक केली. पेट्रोल बघितलं… ते अजून बरंच शिल्लक होतं. बराच वेळ किक मारून बघितली… गाडी सुरू होत नव्हती.

सगळ्या गोष्टी चेक केल्यावर उभं रहात ते म्हणाले, _“इंजिन सिझ झालंय… गाडीतलं सगळं इंजिन ऑइल लीकेज झालंय… तुम्ही तशीच गाडी मारली त्यामुळे इंजिन जॅम झालंय… वेळ लागंल दुरुस्त करायला. पूर्ण इंजिन खोलायला लागंल. आता जरी खोल्लं तरी सकाळपर्यंत होणार नाही काम. त्यात पाऊस आहे…कामगार घरी गेला आताच. आता नाही येणार रात्री.”_

त्या तरुणानं बायकोकडे पाहिलं. ती आता रडवेली झाली होती. नवर्‍याकडे पहात म्हणाली,

_“आता कसं करायचं… शेवटची बस पण गेली आता… नऊला!”_

तो तरुण काही बोलणार, इतक्यात त्याचा फोन वाजला. त्यानं फोन घेतला…

_“हां हॅलो… बोल सोपान… अरे हाय… वाटेत हाय… जरा गाडीला प्रॉब्लेम झालाय… दुरुस्त करुन येतोय… नाही पण… अरे हो, कळलं तस़ं लगोलग निघालोच की… बरं बरं… आमी लवकर येतोय… काळजी करू नका… तासाभरात पोचतो…”_

त्यानं फोन बंद करत बायकोकडे पाहिलं.

_“सारकं तुझं नाव घ्यायल्यात तुमचे आबा… लवकर या म्हणाल्यात… कंडिशन नाजूक आहे…”_

आता मात्र तिचा बांध फुटला. ती हमसून हमसून रडायला लागली. भरीस भर म्हणून पाऊस आता जोरात कोसळायला लागला. तिरका पाऊस आता दुकानाच्या छपरातून आत येऊ लागला.

तो तरुण जफरभाईंकडे आला व हात जोडत म्हणाला,

_“दादा, तुमीच मदत करा… लवकर काहीपण सोय होईल का बघा… रिक्शा… सुमो… कायपण… पैसे काय लागेल ते देतो तिथं पोचून…”_

जफरभाईंनी आसिफकडे पाहिलं. पोरानं मान हलवली.

_“अबी कोन जायेगा अब्बा? दत्तवाड बोलेतू ह्यांशे नही बोलेतो तीस किलोमीटर… और वोबी मेन रोडशे दस किलोमीटर अंदर… हजार दिये तोभी कोई नही जायेगा.”_

जफरभाईंनी मान डोलावली. मग विचार करुन म्हणाले,

_“अस्लम को फोन कर… रिक्शा लेकू आ बोल उसको.”_

_“अब्बा… ऐशे क्या कर रहे तुमे…? अस्लम मुंबई गया नत्ता क्या रहीमचाचा के साथ…? एअरपोर्ट छोडने… आजच रहीमचाचा का हज का फ्लाइट हत्ता… अस्लम कल आयेगा वाप्पीस…”_ आसिफनं आपला बाप पण काय या लोकांच्या चक्करमधे अडकतोय, अशा अविर्भावात उत्तर दिलं.

_“अरे हां…मै भूलही गया…”_ जफरभाई उद्गारले.

मग काहीतर सुचून त्याला चटकन म्हणाले, _“एक काम कर… तू इनकी गाडी दुकान मे लगा. कस्टमरकी एक गाडी निकालकू रख… मै दस मिनट मे आतूं…”_

त्या जोडप्याला धीर देत जफरभाई म्हणाले, _“तुमी थांबा… मी तुमची रिक्षाची व्यवस्था करुन येतो… खच्चून दहा मिनटात येतो.”_

असं म्हणत पोराला पुढे काही बोलायची संधी न देता त्याच्या बाईकवरुन जफरभाई पावसात भिजत निघून गेले.

आसिफनं त्या दोघांकडे एकदा _‘काय आफत आहे!’_ अशा नजरेने पाहिलं व दुकान उघडलं. एक गाडी बाहेर काढली व त्या जोडप्याची गाडी आत दुकानात लावली. ते दोघं अपराधी नजरेने त्याच्याकडे पहात होते.

दहा पंधरा मिनिटं गेली… तरुणीच्या गावातून पुन्हा फोन येऊन गेला. तिच्या आबांची अवस्था अजूनच खराब झाली होती. सगळे तिच्या येण्याकडे डोळे लावून बसले होते. मधेच एक रिक्षा दुकानासमोरून न थांबता निघून गेली. आसिफ त्याच्या मोबाईलवर गर्क होता.

तेवढ्यात अजून एक रिक्षा येताना दिसली. मुसळधार पावसामुळं दिसत नव्हतं पण रिक्षा दुकानाशी आली आणि ड्रायव्हर सीटवरुन जफरभाई स्वतः उतरले.

आसिफनं बापाकडे आश्चर्यचकित होत पाहिलं व विचारलं,

_“अब्बा… तुमीच जानेवाले रिक्षा लेकू… अबी ये बारीशमे…? पागल हुये क्या…??”_

_“क्यों…? गॅरेजशे पयले मै रिक्षा चलाता नत्ता क्या?”_ मग जोडप्याकडे वळून ते म्हणाले, _“चला, बसा भाऊ…बस ग पोरी.”_

ते दोघे रिक्षात बसले. तसा मुलाच्या बाजूनं आसिफ पण रिक्षात बसला.

_“अब्बा, मै भी आ रा… रस्ता मेरकू पता है… और वाटार से शॉर्टकट है, वो तुमकू पता नही होगा.”_

जफरभाई हसले व त्याला म्हणाले,

_“गाडी बाहर है, उसकू चेन लॉक कर… और ताला लगा. ये ले चेन और लॉक…”_ अस म्हणत जफरभाईंनी पायातली चेन आणि कुलूप काढून त्याला दिलं.

आसिफनं मनातल्या मनात बापाला मानलं.

_‘अब्बाला माहीत होतं, मी घरी जाणार नाही… रिक्षानं त्यांच्याबरोबरच जाणार… शेवटी, बाप बाप होता है’_

गाडी लॉक करुन ते निघाले. भयंकर पाऊस सुरु होता. समोरचं नीट दिसत नव्हतं. आसिफ समोर बघत त्याच्या अब्बांना रस्ता सांगत होता.

त्याला माहिती असलेल्या शॉर्टकटनं वाटारवरून घेत जफरभाईंनी एका तासात रिक्षा दत्तवाडला त्या तरुणीच्या घरी पोहोचवली.

घरासमोर थांबता क्षणी रिक्षातून उतरून ती तीरासारखी धावत ओरडतच घरात शिरली…

_“आबा, मी आले… मी आले, आबाऽऽ……”_

जफरभाईंच्या रिक्षाभोवती लोक जमा झाले. गावातल्या लोकांना सर्व हकीकत एव्हाना कळली होती. सर्वांच्या चेहर्‍यावर जणू देवाला पाहिल्याचे भाव होते. कुणीतरी पाणी व चहा घेऊन आलं व त्यांना प्यायला लावला.

दहा मिनिटं शांतता होती…

मग अचानक आतून मोठ्या आवाजात आक्रोश ऐकू आला. जफरभाईंनी आकाशाकडे पाहिले व निश्वास टाकत म्हणाले,

_“या अल्लाह…!!”_

थोड्या वेळानं त्या तरुणीचा भाऊ सोपाननं येऊन जफरभाईंचे हात हातात घेतले व म्हणाला,

_“मिस्त्री साहेब, तुमी दोघांनी देवासारखं काम केलं… दाजी व आमच्या बहिणीला टायमात आणलं… ते बी अशा पावसात… तुमचे लई उपकार झाले. तिला पाहून आमच्या आबानं जीव सोडला. जनमभर घोर लागला असता तिला, जर भेट चुकली असती तर… कशी परतफेड करू?”_ सोपान त्यांचे पाय धरायला वाकला.

_“अरे अरे… भाऊ, काय करताय…!!”_ त्याला अडवत जफरभाई म्हणाले, _“तुमच्या बहिणीच्या वयाची पोरगी आहे माझी पण… लगीन होऊन गेली सासरी. आता जर मी तुमच्या आबाच्या जागी व ती तुमच्या ताईच्या जागी असती तर अजून कुणीतरी हेच केलं आसतं… वेळ आली तर तुमीपण तेच केलं आसतं, जे आमी केलं.”_

रिक्षा स्टार्ट करत जफरभाईंनी रडणार्‍या ‘त्या’ तरुणाचा हात हातात धरत म्हटलं,

_“तुमच्या बायकोला सांभाळा… गाडी रिपेअर करुन ठेवतो तयार उद्या. या कधीपण, येऊन घेऊन जा दोन चार दिवसात, जमेल तसं…”_

लांब गेलेल्या रिक्षाकडे व नंतर तिच्या टेललँपकडे तो तरुण व सोपान दोघे पहात राहिले… ते दिसेनासे होईपर्यंत.

रिक्षानं आणून सोडण्यासाठी दोन हजार रुपयांची त्यांनी दिलेली नोट परत करत जफरभाईंनी दिलेलं उत्तर त्यांच्या कानात अजून घुमत होतं…

*_“माणूस मरतो दादा… माणुसकी नाही…!!!_*
*_खुदा हाफीज…!”_*


आभार (लेखक - सुनील गोबुरे)

~~●○👌📚 📖 👍○●~~

Comments

Popular Posts

दादी माँ ने बताया "भूख बढ़ाने" का नुस्खा।

दादी माँ ने बताया "भूख बढ़ाने" का  नुस्खा। हमारे शरीर की अग्नि खाए गए भोजन को पचाने का काम करती है। यदि यह अग्नि किसी कारण से मंद पड़ जाए तो भोजन ठीक तरह से नही पचता है। भोजन के ठीक से नही पचने के कारण शरीर में कितने ही रोग पैदा हो जाते है। अनियमित खान पान से वायु पित्त और कफ़ दूषित हो जाते है।।जिसकी वजह से भूख लगनी बंद हो जाती है और अजीर्ण अपच वायु विकार तथा पित्त आदि की शिकायतें आने लगती है। Dadi maa ke asardar nuskhe jo bhukh badhate hai, swasthya sudharte hai aur pachan shakti majboot karte hai भूख लगनी बंद हो जाती है, शरीर टूटने लगता है, स्वाद बिगड जाता है। पेट में भारीपन महसूस होने लगता है। पेट खराब होने से दिमाग खराब रहना चालू हो जाता है अथवा समझ लीजिये कि शरीर का पूरा का पूरातंत्र ही खराब हो जाता है। इसके लिये मंन्दाग्नि से हमेशा बचना चाहिए और तकलीफ़ होने पर इन दवाओं का प्रयोग करना चाहिए। भूख नही लगने पर आधा माशा फूला हुआ सुहागा एक कप गुनगुने पानी में दो तीन बार लेने से भूख खुल जाती है। काला नमक चाटने से गैस खारिज होती है, और भूख बढती है। यह नमक पेट को भी साफ़ करता है...

दादी माँ ने बताया "पेट दर्द" का आयुर्वेदिक इलाज

पेट दर्द पेट दर्द" का आयुर्वेदिक इलाज गलत खान पान अथवा अपच के कारण होने वाले पेट दर्द के लिए आयुर्वेद में कुछ नुस्खे बताए गये हैं ! जिनका अगर प्रयोग किया जाए तो पेट दर्द कि परेशानी से बचा जा सकता है ! हालांकि इस तरह के पेट दर्द के लिए आज भी हमारे घरों में आयुर्वेदिक नुस्खे काम में लाये जाते हैं और उनसे आराम भी मिलता है ! ऐसे ही कुछ नुस्खे : - 1 . अदरक और लहसुन को बराबर कि मात्रा में पीसकर एक चम्मच कि मात्रा में पानी के साथ सेवन करने से पेट दर्द में लाभ मिलता है ! 2 . एक ग्राम काला नमक और दो ग्राम अजवायन गर्म पानी के साथ सेवन करने से पेट दर्द में लाभ मिलता है ! 3 . अमरबेल के बीजों को पानी से पीसकर बनाए गये लेप को पेट पर लगाकर कपडे से बाँधने से गैस कि तकलीफ , डकारें आना , अपानवायु न निकलना , पेट दर्द और मरोड़ जैसे कष्ट दूर हो जाते हैं ! 4 . सौंठ , हींग और कालीमिर्च का चूर्ण बराबर कि मात्रा में मिलाकर एक चम्मच कि मात्रा में गर्म पानी के साथ लेने से पेट दर्द में तुरंत आराम मिलता है ! 5 . जटामांसी , सौंठ , आंवला और काला नमक बराबर कि मात्रा में पीस लें और एक एक चम्मच कि मात्रा में तीन ब...

दादी माँ ने बताया "डायबिटीज" का आयुर्वेदिक इलाज

डायबिटीज का आयुर्वेदिक उपचार डायबिटीज अब उम्र, देश व परिस्थिति की सीमाओं को लांघ चुका है। इसके मरीजों का तेजी से बढ़ता आंकड़ा दुनियाभर में चिंता का विषय बन चुका है। जानते हैं कुछ देशी नुस्खे मधुमेह रोगियों के लिए - नीबू: मधुमेह के मरीज को प्यास अधिक लगती है। अतः बार-बार प्यास लगने की अवस्था में नीबू निचोड़कर पीने से प्यास की अधिकता शांत होती है। खीरा: मधुमेह के मरीजों को भूख से थोड़ा कम तथा हल्का भोजन लेने की सलाह दी जाती है। ऐसे में बार-बार भूख महसूस होती है। इस स्थिति में खीरा खाकर भूख मिटाना चाहिए। गाजर-पालक : इन रोगियों को गाजर-पालक का रस मिलाकर पीना चाहिए। इससे आंखों की कमजोरी दूर होती है। शलजम : मधुमेह के रोगी को तरोई, लौकी, परवल, पालक, पपीता आदि का प्रयोग ज्यादा करना चाहिए। शलजम के प्रयोग से भी रक्त में स्थित शर्करा की मात्रा कम होने लगती है। अतः शलजम की सब्जी, पराठे, सलाद आदि चीजें स्वाद बदल-बदलकर ले सकते हैं। जामुन : मधुमेह के उपचार में जामुन एक पारंपरिक औषधि है। जामुन को मधुमेह के रोगी का ही फल कहा जाए तो अतिश्योक्ति नहीं होगी, क्योंकि इसकी गुठली, छाल, रस और गूदा सभी मधुमेह में ...

हरवलेले सूर

🎵 🎷   हरवलेले सूर ➖➖➖➖   "Sun & Sons" कंपनीच्या सीईओ समीरने आपल्या टीम मेंबर्सना थँक्यू म्हणत मीटिंग संपल्याची घोषणा केली व फाइल वर साइन करून ती पी.एला दिली ....           एवढ्यात इंटरकॉम वरून रिसेप्शनिस्ट बोलली.    "- सर आपल्या करता तीन अर्जंट कॉल....", समीर ने फोन रिसीव केला. चेतन चे तीन रेकॉर्डेड मेसेज होते,   समीर --सावनी  इज  सिरीयस, कम सून. दुसरा होता ----    तिला तुला भेटायचंय.‌‍‌... तिसरा--     बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट...             सावनी  सिरीयस, समीर ला काही कळेच ना, त्यांनी चेतनला कॉल केला, पण फोन लागत नव्हता.          समीरने  पीए ला बोलवून काही सूचना दिल्या...... प्रीती ला मेसेज करून मुंबईला जात असल्याचे कळवले. ड्रायव्हरला मुंबईला चलायचे सांगून समीर मागे बसला. आज मन इतके अशांत होते कि गाडी चालवणे ही धोक्याचे वाटत होते . गाडी स्टार्ट...

सरप्राईज

सरप्राईज देण्यासाठी गेली पण... ➖➖➖➖➖ आज पहील्यांदा अचानक गावी जावून आईबाबांना आश्चर्यचकीत करणार होते. मला त्यांच्या डोळ्यातून ओसंडणारा आनंद पाहायचा होता. तब्बल चार महीन्यानी मी गावी जात होते. 'माझ्या असानमेंट पूर्ण करायच्या आहेत त्यामुळे मला गावी यायला नाही जमत आहे' असे अण्णांना सांगून मी मोबाईल बंद केला आणि मी माझी बॅग भरायला घेतली. हॉस्टेलमध्ये माझ्यासोबत आमच्याच गावातील सरीता असल्यामुळे मला कधीच आई बाबांना आश्चर्यचकीत करता आले नव्हते. पण कालच सरीता तिच्या मामाच्या गावी गेली होती. त्यामुळे हा प्लान मला आखता आला होता. माझ्या मोबाईलवर सरीताचा कॉल आला तेव्हा नाखुशीनेच मी तो उचलला. "हॅलो, बोल गं" "मी पोचले, तुझा काय प्लान आहे, शनिवार रविवारचा?" असे सरीताने विचारल्यावर मी सावध पवित्रा घेतला. "मी नानेघाटच्या ट्रेकला जातेय, नाईट स्टे आहे" मी ट्रेकला जाते म्हटल्याबरोबर तिने तिचे बोलणे आवरते घेतले. "ठीक आहे, बरं झालं मी मामाकडे निघून आले ते. मस्त आराम करायचा सोडून कसले ते डोंगर चढता कोणास ठाऊक?" असे बोलून तिने कॉल कट केला. पिच्छा सुटला...

अजेय : योगी आदित्यनाथ के जीवन की अनकही कहानी

"अजेय" 19 सितंबर 2025 को रिलीज़ हुई फिल्म 'अजेय: एन अनटोल्ड स्टोरी ऑफ योगी' का सरल हिंदी भाषा में रिव्यू पढ़ें। जानें कैसी है मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ की यह बायोपिक, इसकी कहानी, कलाकारों का अभिनय और क्या आपको यह फिल्म देखनी चाहिए??? "अजेय: एन अनटोल्ड स्टोरी ऑफ योगी": योगी आदित्यनाथ के जीवन की अनकही कहानी ​ मुंबई: हाल ही में 19 सितंबर 2025 को रिलीज़ हुई फिल्म "अजेय: एन अनटोल्ड स्टोरी ऑफ योगी" उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ के जीवन पर आधारित एक बायोपिक है। यह फिल्म उनके प्रारंभिक जीवन से लेकर एक प्रभावशाली राजनेता बनने तक के सफर को दर्शाती है। फिल्म का निर्देशन रवींद्र गौतम ने किया है और इसमें मुख्य भूमिका में अनंत जोशी ने योगी आदित्यनाथ का किरदार निभाया है। ​यह फिल्म शांतनु गुप्ता की किताब "द मॉन्क हू बिकेम चीफ मिनिस्टर" से प्रेरित है। फिल्म अजय सिंह बिष्ट के साधारण लड़के से योगी आदित्यनाथ बनने की कहानी को पर्दे पर लाती है, जो उत्तराखंड के एक छोटे से गाँव से निकलकर भारत के सबसे बड़े राज्य के मुख्यमंत्री पद तक पहुँचते है। ...

नवरात्रि 2025

नवरात्रि 2025 ​ शारदीय नवरात्रि 2025 के लिए... "Navratri 9 colors, puja vidhi and fasting rules explained with simple tips to celebrate nine days of devotion and spiritual energy." नौ दिनों के ९ रंग: ​ पहला दिन (माँ शैलपुत्री): सफ़ेद ​यह रंग शांति, पवित्रता और सादगी का प्रतीक है। ​ दूसरा दिन (माँ ब्रह्मचारिणी): लाल ​यह रंग साहस, शक्ति, ऊर्जा और प्रेम को दर्शाता है। ​ तीसरा दिन (माँ चंद्रघंटा): रॉयल ब्लू (शाही नीला) ​यह रंग समृद्धि, शांति और स्थिरता का प्रतीक है। ​ चौथा दिन (माँ कूष्मांडा): पीला ​यह रंग खुशी, चमक और ज्ञान का प्रतीक है। ​ पांचवां दिन (माँ स्कंदमाता): हरा ​यह रंग प्रकृति, विकास और उर्वरता को दर्शाता है। ​ छठा दिन (माँ कात्यायनी): ग्रे (स्लेटी) ​यह रंग बुराई को नष्ट करने की शक्ति का प्रतीक है। ​ सातवां दिन (माँ कालरात्रि): नारंगी ​यह रंग ऊर्जा, उत्साह और सकारात्मकता का प्रतीक है। ​ आठवां दिन (माँ महागौरी): मोरपंखी हरा ​यह रंग विशिष्टता, नवीनता और समृद्धि का प्रतीक है। ​ नौवां दिन (माँ सिद्धिदात्री): गुलाबी ​यह रंग प्रे...

मीराई - फिल्म (Mirai - Super Yodha)

फिल्म रिव्यू: मिराई (Mirai - Super Yodha) ​तेलुगु अभिनेता तेजा सज्जा की फिल्म 'हनु-मान' की शानदार सफलता के बाद, उनकी अगली फिल्म 'मिराई' 12 सितंबर 2025 को सिनेमाघरों में रिलीज़ हुई। यह एक फैंटेसी-एक्शन एडवेंचर फिल्म है, जो प्राचीन भारतीय इतिहास और भविष्य की तकनीक का एक अनूठा मिश्रण प्रस्तुत करती है। ​ कहानी (Plot) ​फिल्म की कहानी अशोक के नौ रहस्मयी रत्नों (Nine Unknown Men) की प्राचीन कथा पर आधारित है। कहानी वेदा (तेजा सज्जा) के इर्द-गिर्द घूमती है, जो एक साधारण युवक है और अपनी रोजी-रोटी के लिए छोटे-मोटे काम करता है। उसकी जिंदगी तब बदल जाती है जब उसे पता चलता है कि वह एक 'सुपर योद्धा' है और उसका भाग्य प्राचीन ग्रंथों की रक्षा करने से जुड़ा है। ​एक दुष्ट शक्ति, जिसे 'ब्लैक स्वॉर्ड' (The Black Sword) कहा जाता है और जिसका नेतृत्व महावीर लामा (मंचू मनोज) कर रहा है, इन नौ पवित्र ग्रंथों को हासिल करना चाहता है ताकि वह दुनिया पर राज कर सके। वेदा को इन ग्रंथों को बचाने और दुनिया को अंधकार से बचाने के लिए अपनी शक्तियों को अपनाना पड़ता है। इस सफर में एक संन्यास...

मराठी माणूस “मागे” का???

मराठी माणूस “मागे” का??? मराठी माणूस “मागे” असण्याची २३ कारणे… आर्थिक सल्लागार मकरंद गाडगीळ यांच्या लेखणीतून… १) कमी प्रवास प्रवास केल्याने जग कळते, कल्पना सुचतात, मार्ग सापडतात व प्रगती होते. मराठी माणूस आर्थिक स्थितीमुळे फारसा प्रवास करताना दिसत नाही, अनेक औद्योगिक प्रदर्शनात मराठी माणूस दिसत नाही. २) अति राजकारण सर्वतजास्त मराठी माणूस राजकारण वेडा आहे. राजकीय नेत्यांच्या सभेला आपला कामधंदा सोडून लाखोंच्या संख्येने येणारा मराठी माणूसच असतो. यात व्यापारी समाजातला एक तरी माणूस दिसतो का? मी काय करतो आहे या पेक्षा लोकांनी काय केले, काय करतात यात जास्त लक्ष. ३) दोनच हात कमावणारे सर्वसाधारण मराठी कुटुंबात एकच व्यक्ती कमवते. कुटुंबातील जास्तीत जास्त लोकांनी काम केले पाहिजे. ४) सर्वांची तोंडे वेगळ्या दिशेला कुटुंबात एकी नसते. बाप एका दिशेला, मोठा मुलगा एका दिशेला तर लहान भाऊ तिसरीकडेच. प्रत्येक कुटूंबात एकी पाहिजे. ५)  खोटं बोल पण रेटून बोल सगळ्या थापा एकमेकांना गंडवण्याच्या गोष्टी, खरे सांगण्यासारखे नसतेच म्हणून खोट बोलावे लागते. मी हे करीन ते करीन या स्वप्नातच आयुष्य संपते, पण मी हे कर...