Skip to main content

“माणुसकी – मनाला स्पर्श करणारी कथा”

माणुसकी

➖➖➖➖➖➖➖➖➖


“माणुसकी आणि करुणा यांवर आधारित मराठी कथा, संकटातही माणुसकी जपणाऱ्या व्यक्तिरेखांची हृदयस्पर्शी कहाणी”



रात्रीचे नऊ वाजलेले पाहून जफरभाईंनी आपल्या पोराला, आसिफला, हाक दिली…

“ओ आसिफ… चल गाडीयां अंदर लगा.”

आसिफ मित्रासोबत गप्पा मारत होता. मित्राला _“चल उद्या सकाळी कॉलेजात भेटू”_ म्हणत त्यानं कटवलं व दुरुस्तीला आलेल्या गाड्या आत दुकानात एका बाजूला एक लावू लागला.

बारा बाय दहाच्या दुकानात पाच सहा गाड्या बसवायची कसरत रोज करायला लागायची. पण गिर्‍हाइकाच्या  गाड्या बाहेर ठेवून चालणार नाही, हे त्यालाही ठाऊक होतं. त्यात बारीक पाऊस चालू झाला होता.

गाड्या लावून होईपर्यंत जफरभाईंनी सगळं सामान आत ठेऊन दिलं. हात धुतले व पोराकडे पाहिलं… त्यांना बरं वाटलं.

_‘आपण नशीबवान… पोरगं कॉलेज शिकतंय आणि धंद्यात पण आपल्याला मदत करतंय. नाहीतर आपल्या भावांची पोरं… सगळीजण गॅरेजच्या कामात… पण दहावीच्या पुढे एकपण शिकला नाही.’_

पाऊस आता वाढला होता. अजून वाढण्याआधी घरी पोहोचणं आवश्यक होतं.

दुकानाचं शटर ओढून कुलूप लावून जफरभाई वळणार, तोच एक तरुण जोडपं गाडी ढकलत त्यांच्या दरवाज्याशी आलं. बाइकवर आधीच जाऊन बसलेला आसिफ लगेचच म्हणाला,

_“दुकान बंद हुआ भाई…!”_

जफरभाईंनी आसिफकडे फक्त एक कटाक्ष टाकला.
त्यांनी समोर येत त्या जोडप्याला विचारलं,

_“काय झालं गाडीला?”_

तरुण सायलेन्सरकडे बोट दाखवत म्हणाला, _“गावातनं निगालो तवाच जरा गचके मारत होती… मिस्त्रीला दावायला वेळ नवता… जरा इमरजन्शी झाल्या…”_  बायकोकडे हात दाखवत तो म्हणाला, _“हिच्या गावी दत्तवाडला निगालतो… पण इथं नाक्यापर्यंत कसंतरी आलो आणि गाडी बंद पडली. तीन किलोमीटर ढकलत आणलीय… लवकर पोचायचय. हिचे आबा… म्हंजी वडील… लई शिरीयस हायेत. बघा जरा काही होतंय का काही करुन चालू…”_

जफरभाईंनी तरुणीकडे पाहिलं. तिच्या चेहर्‍यावरचे भावच सर्व सांगून गेले. त्यानं दोघांना छपराखाली आडोशाला घेतलं.

_“बघू…”_ म्हणत त्यानी बाईक स्टँडला लावून चेक केली. पेट्रोल बघितलं… ते अजून बरंच शिल्लक होतं. बराच वेळ किक मारून बघितली… गाडी सुरू होत नव्हती.

सगळ्या गोष्टी चेक केल्यावर उभं रहात ते म्हणाले, _“इंजिन सिझ झालंय… गाडीतलं सगळं इंजिन ऑइल लीकेज झालंय… तुम्ही तशीच गाडी मारली त्यामुळे इंजिन जॅम झालंय… वेळ लागंल दुरुस्त करायला. पूर्ण इंजिन खोलायला लागंल. आता जरी खोल्लं तरी सकाळपर्यंत होणार नाही काम. त्यात पाऊस आहे…कामगार घरी गेला आताच. आता नाही येणार रात्री.”_

त्या तरुणानं बायकोकडे पाहिलं. ती आता रडवेली झाली होती. नवर्‍याकडे पहात म्हणाली,

_“आता कसं करायचं… शेवटची बस पण गेली आता… नऊला!”_

तो तरुण काही बोलणार, इतक्यात त्याचा फोन वाजला. त्यानं फोन घेतला…

_“हां हॅलो… बोल सोपान… अरे हाय… वाटेत हाय… जरा गाडीला प्रॉब्लेम झालाय… दुरुस्त करुन येतोय… नाही पण… अरे हो, कळलं तस़ं लगोलग निघालोच की… बरं बरं… आमी लवकर येतोय… काळजी करू नका… तासाभरात पोचतो…”_

त्यानं फोन बंद करत बायकोकडे पाहिलं.

_“सारकं तुझं नाव घ्यायल्यात तुमचे आबा… लवकर या म्हणाल्यात… कंडिशन नाजूक आहे…”_

आता मात्र तिचा बांध फुटला. ती हमसून हमसून रडायला लागली. भरीस भर म्हणून पाऊस आता जोरात कोसळायला लागला. तिरका पाऊस आता दुकानाच्या छपरातून आत येऊ लागला.

तो तरुण जफरभाईंकडे आला व हात जोडत म्हणाला,

_“दादा, तुमीच मदत करा… लवकर काहीपण सोय होईल का बघा… रिक्शा… सुमो… कायपण… पैसे काय लागेल ते देतो तिथं पोचून…”_

जफरभाईंनी आसिफकडे पाहिलं. पोरानं मान हलवली.

_“अबी कोन जायेगा अब्बा? दत्तवाड बोलेतू ह्यांशे नही बोलेतो तीस किलोमीटर… और वोबी मेन रोडशे दस किलोमीटर अंदर… हजार दिये तोभी कोई नही जायेगा.”_

जफरभाईंनी मान डोलावली. मग विचार करुन म्हणाले,

_“अस्लम को फोन कर… रिक्शा लेकू आ बोल उसको.”_

_“अब्बा… ऐशे क्या कर रहे तुमे…? अस्लम मुंबई गया नत्ता क्या रहीमचाचा के साथ…? एअरपोर्ट छोडने… आजच रहीमचाचा का हज का फ्लाइट हत्ता… अस्लम कल आयेगा वाप्पीस…”_ आसिफनं आपला बाप पण काय या लोकांच्या चक्करमधे अडकतोय, अशा अविर्भावात उत्तर दिलं.

_“अरे हां…मै भूलही गया…”_ जफरभाई उद्गारले.

मग काहीतर सुचून त्याला चटकन म्हणाले, _“एक काम कर… तू इनकी गाडी दुकान मे लगा. कस्टमरकी एक गाडी निकालकू रख… मै दस मिनट मे आतूं…”_

त्या जोडप्याला धीर देत जफरभाई म्हणाले, _“तुमी थांबा… मी तुमची रिक्षाची व्यवस्था करुन येतो… खच्चून दहा मिनटात येतो.”_

असं म्हणत पोराला पुढे काही बोलायची संधी न देता त्याच्या बाईकवरुन जफरभाई पावसात भिजत निघून गेले.

आसिफनं त्या दोघांकडे एकदा _‘काय आफत आहे!’_ अशा नजरेने पाहिलं व दुकान उघडलं. एक गाडी बाहेर काढली व त्या जोडप्याची गाडी आत दुकानात लावली. ते दोघं अपराधी नजरेने त्याच्याकडे पहात होते.

दहा पंधरा मिनिटं गेली… तरुणीच्या गावातून पुन्हा फोन येऊन गेला. तिच्या आबांची अवस्था अजूनच खराब झाली होती. सगळे तिच्या येण्याकडे डोळे लावून बसले होते. मधेच एक रिक्षा दुकानासमोरून न थांबता निघून गेली. आसिफ त्याच्या मोबाईलवर गर्क होता.

तेवढ्यात अजून एक रिक्षा येताना दिसली. मुसळधार पावसामुळं दिसत नव्हतं पण रिक्षा दुकानाशी आली आणि ड्रायव्हर सीटवरुन जफरभाई स्वतः उतरले.

आसिफनं बापाकडे आश्चर्यचकित होत पाहिलं व विचारलं,

_“अब्बा… तुमीच जानेवाले रिक्षा लेकू… अबी ये बारीशमे…? पागल हुये क्या…??”_

_“क्यों…? गॅरेजशे पयले मै रिक्षा चलाता नत्ता क्या?”_ मग जोडप्याकडे वळून ते म्हणाले, _“चला, बसा भाऊ…बस ग पोरी.”_

ते दोघे रिक्षात बसले. तसा मुलाच्या बाजूनं आसिफ पण रिक्षात बसला.

_“अब्बा, मै भी आ रा… रस्ता मेरकू पता है… और वाटार से शॉर्टकट है, वो तुमकू पता नही होगा.”_

जफरभाई हसले व त्याला म्हणाले,

_“गाडी बाहर है, उसकू चेन लॉक कर… और ताला लगा. ये ले चेन और लॉक…”_ अस म्हणत जफरभाईंनी पायातली चेन आणि कुलूप काढून त्याला दिलं.

आसिफनं मनातल्या मनात बापाला मानलं.

_‘अब्बाला माहीत होतं, मी घरी जाणार नाही… रिक्षानं त्यांच्याबरोबरच जाणार… शेवटी, बाप बाप होता है’_

गाडी लॉक करुन ते निघाले. भयंकर पाऊस सुरु होता. समोरचं नीट दिसत नव्हतं. आसिफ समोर बघत त्याच्या अब्बांना रस्ता सांगत होता.

त्याला माहिती असलेल्या शॉर्टकटनं वाटारवरून घेत जफरभाईंनी एका तासात रिक्षा दत्तवाडला त्या तरुणीच्या घरी पोहोचवली.

घरासमोर थांबता क्षणी रिक्षातून उतरून ती तीरासारखी धावत ओरडतच घरात शिरली…

_“आबा, मी आले… मी आले, आबाऽऽ……”_

जफरभाईंच्या रिक्षाभोवती लोक जमा झाले. गावातल्या लोकांना सर्व हकीकत एव्हाना कळली होती. सर्वांच्या चेहर्‍यावर जणू देवाला पाहिल्याचे भाव होते. कुणीतरी पाणी व चहा घेऊन आलं व त्यांना प्यायला लावला.

दहा मिनिटं शांतता होती…

मग अचानक आतून मोठ्या आवाजात आक्रोश ऐकू आला. जफरभाईंनी आकाशाकडे पाहिले व निश्वास टाकत म्हणाले,

_“या अल्लाह…!!”_

थोड्या वेळानं त्या तरुणीचा भाऊ सोपाननं येऊन जफरभाईंचे हात हातात घेतले व म्हणाला,

_“मिस्त्री साहेब, तुमी दोघांनी देवासारखं काम केलं… दाजी व आमच्या बहिणीला टायमात आणलं… ते बी अशा पावसात… तुमचे लई उपकार झाले. तिला पाहून आमच्या आबानं जीव सोडला. जनमभर घोर लागला असता तिला, जर भेट चुकली असती तर… कशी परतफेड करू?”_ सोपान त्यांचे पाय धरायला वाकला.

_“अरे अरे… भाऊ, काय करताय…!!”_ त्याला अडवत जफरभाई म्हणाले, _“तुमच्या बहिणीच्या वयाची पोरगी आहे माझी पण… लगीन होऊन गेली सासरी. आता जर मी तुमच्या आबाच्या जागी व ती तुमच्या ताईच्या जागी असती तर अजून कुणीतरी हेच केलं आसतं… वेळ आली तर तुमीपण तेच केलं आसतं, जे आमी केलं.”_

रिक्षा स्टार्ट करत जफरभाईंनी रडणार्‍या ‘त्या’ तरुणाचा हात हातात धरत म्हटलं,

_“तुमच्या बायकोला सांभाळा… गाडी रिपेअर करुन ठेवतो तयार उद्या. या कधीपण, येऊन घेऊन जा दोन चार दिवसात, जमेल तसं…”_

लांब गेलेल्या रिक्षाकडे व नंतर तिच्या टेललँपकडे तो तरुण व सोपान दोघे पहात राहिले… ते दिसेनासे होईपर्यंत.

रिक्षानं आणून सोडण्यासाठी दोन हजार रुपयांची त्यांनी दिलेली नोट परत करत जफरभाईंनी दिलेलं उत्तर त्यांच्या कानात अजून घुमत होतं…

*_“माणूस मरतो दादा… माणुसकी नाही…!!!_*
*_खुदा हाफीज…!”_*


आभार (लेखक - सुनील गोबुरे)

~~●○👌📚 📖 👍○●~~

Comments

Popular Posts

दादी माँ ने बताया "भूख बढ़ाने" का नुस्खा।

दादी माँ ने बताया "भूख बढ़ाने" का  नुस्खा। हमारे शरीर की अग्नि खाए गए भोजन को पचाने का काम करती है। यदि यह अग्नि किसी कारण से मंद पड़ जाए तो भोजन ठीक तरह से नही पचता है। भोजन के ठीक से नही पचने के कारण शरीर में कितने ही रोग पैदा हो जाते है। अनियमित खान पान से वायु पित्त और कफ़ दूषित हो जाते है।।जिसकी वजह से भूख लगनी बंद हो जाती है और अजीर्ण अपच वायु विकार तथा पित्त आदि की शिकायतें आने लगती है। Dadi maa ke asardar nuskhe jo bhukh badhate hai, swasthya sudharte hai aur pachan shakti majboot karte hai भूख लगनी बंद हो जाती है, शरीर टूटने लगता है, स्वाद बिगड जाता है। पेट में भारीपन महसूस होने लगता है। पेट खराब होने से दिमाग खराब रहना चालू हो जाता है अथवा समझ लीजिये कि शरीर का पूरा का पूरातंत्र ही खराब हो जाता है। इसके लिये मंन्दाग्नि से हमेशा बचना चाहिए और तकलीफ़ होने पर इन दवाओं का प्रयोग करना चाहिए। भूख नही लगने पर आधा माशा फूला हुआ सुहागा एक कप गुनगुने पानी में दो तीन बार लेने से भूख खुल जाती है। काला नमक चाटने से गैस खारिज होती है, और भूख बढती है। यह नमक पेट को भी साफ़ करता है...

मराठी माणूस “मागे” का???

मराठी माणूस “मागे” का??? मराठी माणूस “मागे” असण्याची २३ कारणे… आर्थिक सल्लागार मकरंद गाडगीळ यांच्या लेखणीतून… १) कमी प्रवास प्रवास केल्याने जग कळते, कल्पना सुचतात, मार्ग सापडतात व प्रगती होते. मराठी माणूस आर्थिक स्थितीमुळे फारसा प्रवास करताना दिसत नाही, अनेक औद्योगिक प्रदर्शनात मराठी माणूस दिसत नाही. २) अति राजकारण सर्वतजास्त मराठी माणूस राजकारण वेडा आहे. राजकीय नेत्यांच्या सभेला आपला कामधंदा सोडून लाखोंच्या संख्येने येणारा मराठी माणूसच असतो. यात व्यापारी समाजातला एक तरी माणूस दिसतो का? मी काय करतो आहे या पेक्षा लोकांनी काय केले, काय करतात यात जास्त लक्ष. ३) दोनच हात कमावणारे सर्वसाधारण मराठी कुटुंबात एकच व्यक्ती कमवते. कुटुंबातील जास्तीत जास्त लोकांनी काम केले पाहिजे. ४) सर्वांची तोंडे वेगळ्या दिशेला कुटुंबात एकी नसते. बाप एका दिशेला, मोठा मुलगा एका दिशेला तर लहान भाऊ तिसरीकडेच. प्रत्येक कुटूंबात एकी पाहिजे. ५)  खोटं बोल पण रेटून बोल सगळ्या थापा एकमेकांना गंडवण्याच्या गोष्टी, खरे सांगण्यासारखे नसतेच म्हणून खोट बोलावे लागते. मी हे करीन ते करीन या स्वप्नातच आयुष्य संपते, पण मी हे कर...

हरवलेले सूर

🎵 🎷   हरवलेले सूर ➖➖➖➖   "Sun & Sons" कंपनीच्या सीईओ समीरने आपल्या टीम मेंबर्सना थँक्यू म्हणत मीटिंग संपल्याची घोषणा केली व फाइल वर साइन करून ती पी.एला दिली ....           एवढ्यात इंटरकॉम वरून रिसेप्शनिस्ट बोलली.    "- सर आपल्या करता तीन अर्जंट कॉल....", समीर ने फोन रिसीव केला. चेतन चे तीन रेकॉर्डेड मेसेज होते,   समीर --सावनी  इज  सिरीयस, कम सून. दुसरा होता ----    तिला तुला भेटायचंय.‌‍‌... तिसरा--     बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट...             सावनी  सिरीयस, समीर ला काही कळेच ना, त्यांनी चेतनला कॉल केला, पण फोन लागत नव्हता.          समीरने  पीए ला बोलवून काही सूचना दिल्या...... प्रीती ला मेसेज करून मुंबईला जात असल्याचे कळवले. ड्रायव्हरला मुंबईला चलायचे सांगून समीर मागे बसला. आज मन इतके अशांत होते कि गाडी चालवणे ही धोक्याचे वाटत होते . गाडी स्टार्ट...

“दुरावा – नात्यांतील अंतराची भावकथा”

 ❇️ दुरावा ➖➖➖➖➖➖➖➖➖ स्नेहा ऑफिसमधून परतली आणि सोफ्यावर विसावली. डोअर बेल वाजली म्हणून तिने दरवाजा उघडला. तर बाहेर तिचे वडील उभे होते.  "पप्पा! आज लवकर?" "हो. कारणच तस आहे." "म्हणजे?" "तो टीव्ही लाव आधी." "कशाला?" "तुझा नवरा हिरो झालाय आज." पप्पा थोड्या उत्साहाने म्हणाले. "म्हणजे! मला समजल नाही." "थांब. मीच टीव्ही लावतो." अस बोलून त्यांनी रिमोट हातात घेतला आणि चॅनल बदलायला सुरुवात केली. "हां. बघ आता." स्नेहाने पाहिलं. टीव्हीवर न्यूज येत होती. स्कूल टीचर बीकम्स हिरो आणि अनिरुद्धचा फोटो तिला दिसला. त्याला जखमी अवस्थेमध्ये स्ट्रेचरवरून घेऊन जात होते. त्यानंतर एक व्हिडिओ दाखवला. त्यात अनिरुद्ध एका जळत्या बसकडे धावत जाताना दिसत होता. मागे शाळेला आग लागलेली दिसत होती. लोक ओरडत होते. अनिरुद्ध धावत जळत्या बसमध्ये गेला आणि थोड्या वेळाने एका मुलीला खांद्यावर घेऊन परतला. आणि..आणि काही क्षणातच त्या बसमध्ये स्फोट झाला आणि ती पूर्णपणे खाक झाली.       स्नेहा डोळे विस्फारून सर्व पाहत होती. तिला सगळंच फार धक्कादाय...

दादी माँ ने बताया माइग्रेन (आधे सिर मैं दर्द) का आयुर्वेदिक इलाज।

माइग्रेन दादी माँ ने बताया "माइग्रेन (आधे सिर मैं दर्द) का आयुर्वेदिक इलाज। इस रोग से पीड़ित रोगी के सिर में बहुत तेज दर्द होता है तथा यह दर्द सिर के एक भाग में होता है। इस रोग का इलाज प्राकृतिक चिकित्सा से किया जा सकता है। माइग्रेन (आधे सिर में दर्द) रोग होने का लक्षण:- इस रोग से पीड़ित रोगी के सिर के आधे भाग में तेज दर्द होता है तथा सिर में दर्द होने के साथ-साथ रोगी को उल्टी होने की इच्छा भी होती है। इसके अलावा रोगी को चिड़चडाहट तथा दृष्टिदोष भी उत्पन्न होने लगता है। इस रोग का प्रभाव अधिकतर निश्चित समय पर होता है। माइग्रेन (आधे सिर में दर्द) रोग होने का कारण : 1. माइग्रेन (आधे सिर में दर्द) रोग रोगी व्यक्ति को दूसरे रोगों के फलस्वरूप हो जाता है जैसे- नजला, जुकाम, शरीर के अन्य अंग रोग ग्रस्त होना, पुरानी कब्ज आदि। 2. स्त्रियों को यदि मासिकधर्म में कोई गड़बड़ी हो जाती है तो इसके कारण स्त्रियों को माइग्रेन रोग (आधे सिर में दर्द) हो जाता है। 3. आंखों में दृष्टिदोष तथा अन्य रोग होने के कारण भी माइग्रेन रोग (आधे सिर में दर्द) हो जाता है। 4. यकृत (जिगर) में किसी प्रकार की खराबी तथा शरी...

They Call Him OG (पवन कल्याण)

🎬 They Call Him OG मूवी रिव्यू फिल्म का परिचय They Call Him OG एक एक्शन और गैंगस्टर ड्रामा फिल्म है, जिसका निर्देशन सुजीत ने किया है। फिल्म में पवन कल्याण मुख्य भूमिका में हैं और विलेन के रूप में इमरान हाशमी नजर आते हैं। इनके साथ प्रियंका मोहन, प्रकाश राज और अर्जुन दास जैसे कलाकार भी शामिल हैं। "पवन कल्याण की दमदार एक्शन फिल्म They Call Him OG, गैंगस्टर ड्रामा, जबरदस्त स्टाइल और फैंस के लिए खास तोहफा है।" नाम: They Call Him OG निर्देशक: Sujeeth  कलाकार: Pawan Kalyan (मुख्य किरदार), Emraan Hashmi (खलनायक), Priyanka Mohan, Prakash Raj, Arjun Das इत्यादी  समय: लगभग १५४ मिनिटे  भाषा: तेलुगू (डब और सबटायटल सहित अन्य भाषां में भी प्रसारित किया गया है)   रिलीज़ डेट: २५ सप्टेंबर २०२५ (भारत और विदेशों में)  फिल्म की कहानी फिल्म की कहानी ओजी (OG / Ojas Gambheera) नाम के एक पुराने गैंगस्टर के इर्द-गिर्द घूमती है। दस साल तक गायब रहने के बाद वह मुंबई लौटता है। उसका मकसद है अपने पुराने दुश्मन ओमी भाऊ से हिसाब बराबर करना। इस दौरान उसे धोखे, राजनीति, गैंगवार और निजी जज़्बात का...

निरपेक्ष

'निरपेक्ष' ➖➖➖➖➖ त्याचं ड्रिंक संपवून तो बिल मागवणारच होता,  इतक्यात  'ती' मुलगी त्याच्या टेबल जवळ आली. ब-याच वेळेपासून ती त्याच्यावर नजर लावून बसली होती. एकवीस-बावीस वर्षे वय असावं तिचं फार तर फार. त्याने तोवर तिच्याकडे फारसे लक्षही दिले नव्हते. शेवटी धाडस करुन ती त्याच्यासमोर येउन उभी राहिली. 'सो..हँडसम..शनिवारची रात्र आहे..हाउ अबौट सम फन?' त्याने तिच्याकडे पाहिलं... त्याला प्रेटी वूमन मधल्या ज्युलीया राॕबर्टसची उगीचच आठवण झाली. म्हणजे रिचर्ड गिअर... स्वतःच्या मनात आलेल्या विचारांना तो हसला व तिला म्हणाला 'सॉरी मिस..नाॕट इंटरेस्टेड' ती थोडीशी नाराज झाली.. पण मग एका वेगळ्याच निर्धाराने त्याच्यासमोरच्या खुर्चीवर बसली. शांतपणे एक सिगारेट शिलगावत त्याला म्हणाली 'कमीटेड आहेस? मी पहातेय तु एकटाच आहेस..असतोस. नेहमी विकेंड्सना बघते इथे तुला..एकटाच येतोस..बिअर पितोस..जातोस..कधी कोणी मुलगी बरोबर नसते.' सिगरेटचा एक झुरका घेत ती हळू आवाजात मिश्कीलपणे म्हणाली  'प्लीज 'गे' आहेस असं सांगू नको मला आता..' तो परत हसला. तिने सोडलेल्या ...