Skip to main content

निर्णय

 ⚙️ 🈸 निर्णय


➖➖➖➖➖


A WOMAN'S DECISION


काल साडेपाच चा गजर झाला आणि रोजच्या प्रमाणं तो दहा मिनिटं Snooze करून मी पांघरूण ओढून घेतलं. 


पाच चाळीस ला परत एकदा फोनची केकावली ऐकली आणि आळोखे पिळोखे देत उठले कशीबशी अंथरुणातून. 


नवरा गाढ झोपेत होता. मनात म्हटलं, किती नशीबवान प्राणी आहे यार! छान सात वाजता उठेल आणि स्वतःचं आवरून, डबा घेऊन पळेल ऑफिसला. इकडची काडी तिकडे नको करायला. 


पूर्वी कौतुक वाटायचं त्याच्या या वागण्याचं… पण हल्ली संताप येतो आणि तिळपापड होतो माझा नुसता. चरफड होते, पण काय करणार? मीच सोकावून ठेवलंय सगळ्यांना. 


तोंडावर पाण्याचे हबके मारले आणि आणि केसाचा बुचडा बांधला पटकन. हात चटचट चालवायला हवे होते. वेळेत निघाले तरच महिला विशेष गाडी मिळते. थोडं टेकायला मिळतं बूड, चौथ्या सीटवर तरी.


प्रातर्विधी उरकले पटापट, भसाभसा दात घासले यंत्रवत, आधण ठेवलं चहासाठी आणि कणकेचा डबा उघडला.


सकाळी उठून कणिक भिजवायची म्हणजे चिडचिड नुसती!


एकीकडे, कालच घरी येताना आणलेली, निवडलेली, फरसबी धुवून घेतली. 


चहा घेऊन जरा बरं वाटलं. तात्पुरता दिलासा, थकलेल्या शरीराला आणि मनाला. 


उसासा टाकून उठले, घडाळ्याचा काटा आज जरा जास्तच वेगात फिरतोय असा भास झाला मला. 


भाजी फोडणीला टाकली आणि पीठ भिजवायला सुरुवात केली एकीकडे. मनात आजच्या ऑडिटची उजळणी सुरू होती. खडूस ऑडिटर येणार होता. त्याची सरबराई करायची होती. वेळेत पोहोचायलाच हवं होतं आज. 


तवा तापत टाकला आणि लेकाला हाका मारायला सुरुवात केली. रात्रीचा दिवस करणारा हा भिडू, सकाळी उठायला जीव काढत असे माझा. पन्नास हाका झाल्यावर जरा कुठे हालचाल दिसू लागायची त्याची. कधीतरी तर वाटायचं, लोटी भरून गार पाणी ओतावं डोसक्यावर त्याच्या, म्हणजे तरी लौकर उठेल बाब्या. 


तो वेळेत कॉलेजला पोहोचावा याचा आटापिटा!


दोन हात, दोन पाय आणि एक डोकं यांच्या बळावर किती लढाया लढायच्या? 


पोळ्या झाल्या, भाजी झाली आणि आबा आले चहा मागायला तेवढ्यात… चहा गरम करून दिला त्यांना आणि आंघोळीला पळाले. 


गरम पाण्याच्या धारा अंगावरून ओघळल्यावर अगदी बरं वाटत गेलं. जास्त रेंगाळण्याइतका वेळ नव्हताच. ती चैन फक्त रविवारी. 


कपडे बदलून डबे भरले तिघांचे, माझा उचलून पर्समध्ये कोंबला आणि नवी लढाई लढण्यासाठी घराबाहेर पडले.


आता बस नाहीतर रिक्षा, मग स्टेशन आणि तिथे गाडीत लोटून द्यायचं होतं स्वतःला. 


गेली पंचवीस वर्षे अव्याहत सुरू होती ही लढाई, गरजेची होती संसाराला हातभार लावायला. मुलाचं शिक्षण, सासुबाईंचं आजारपण, घराचे हप्ते सगळं या नोकरीच्या टेकूमुळं निभावलं. 


दोघांच्या नोकरीमुळे परिस्थिति बदलली आमची, पण मन आणि शरीर मात्र होरपळून गेलं.


आता विसाव्याची, थोडं स्वतःकडे बघायची, स्वतःला वेळ द्यायची निकड वाटायला लागली होती. रोज विचार यायचे मनात आणि एकदा कामात बुडाले की ते विचारही रसातळाला जायचे आपोआप, परत दुसऱ्या दिवशी उचंबळून येण्यासाठी. 


गेले काही महिने हे अव्याहत सुरू होतं चक्र. थांबायला हवं असं वाटत होतं आता, पण धीर होत नव्हता. 


नवऱ्याला काय, ना सोयर ना सुतक. तो त्याच्या जगात रममाण. निर्णय मलाच घ्यायला हवा होता.


एक मैत्रीण आहे माझी शाळेपासूनची, ती समुपदेशन करते बरीच वर्ष. तिला फोन केला आणि मनाची व्यथा व्यक्त केली तिच्यासमोर. 


ये म्हणाली भेटायला जमेल तेव्हा, पण लवकरात लवकर.


दुसऱ्याच दिवशी जरा लवकर निघून पोहोचले तिच्याकडे. आधीच फोन झाला होता, त्यामुळे वाट न बघायला लागता लगोलग पाचारण करण्यात आलं मला. 


जरा स्थिरस्थावर झाल्यावर, इकडची तिकडची चौकशी झाल्यावर तिने हळुहळू गाडी मुख्य विषयाकडे वळवली आणि मी भडाभडा बोलायला लागले. सगळंच सांगितलं तिला, आडपडदा न ठेवता. नवऱ्याशी असलेल्या आणि नसलेल्या शारीरिक संबंधांबद्दल पण व्यक्त झाले मी!


खूप बरं वाटलं. मोकळं अगदी. योग्य तिथं प्रश्न विचारत, ती पार मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचली माझ्या. 


मला म्हणाली, _“बऱ्याच नोकरी करणाऱ्या स्त्रियांना येतो हा अनुभव. आम्ही ‘Burnout Syndrome‘ म्हणतो त्याला._


_“बरेच पुरुषही जातात या आवर्तनामधून. आजच्या युगाची ही भेट आहे आपल्याला._


_“तुला आर्थिक गरज नसेल, जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या असतील आणि कुतरओढ होत असेल, काम आणि घर सांभाळताना, तर स्वेच्छानिवृत्ती घेऊन मनासारखी जगू शकतेस तू, त्यात अपराधी वाटण्याचं काही एक कारण नाही. पेन्शन मिळेलच की तुला, का एवढी काळजी करतेयस?”_


अगदी माझ्या मनातलं बोलली ती. शिक्कामोर्तब जणू माझ्या निर्णयावर! 


आर्थिक नुकसान किती होईल यापेक्षा, स्वतःला आणि कुटुंबाला वेळ देता येईल, मनासारखं जगता येईल, हिंडता फिरता येईल, ही फार मोठी जमेची बाजू वाटली मला. 


निर्णय पक्का झाला माझा आणि घरी जाऊन नवऱ्याकडे आणि आबांकडे सुतोवाच केलं. 


आबांचा पूर्ण पाठिंबा मिळाला. नवरा पण, हो नाही करत एकदाचा तयार झाला. अर्थात, मी परवानगी नव्हती विचारली त्याला, पण सांगण्याचं कर्तव्य होतं माझं, ते पार पाडलं मी. 


जवळपास आठ वर्ष आधी मी निवृत्तीचा निर्णय घेतला होता. कसं असेल ते आयुष्य, याचा विचार करतच, बऱ्याच उशिरा मला झोप लागली.  


आज निवृत्त होऊन सहा महीने झालेत, काय गमावलं आणि काय कमावलं याचा ताळेबंद मांडताना, कमाईचं पारडं अंमळ जास्तच झुकलेलं भासतंय मला. 


घर जरा जास्तच हसरं वाटू लागलंय, विकत घेऊन कपाटाची धन झालेल्या पुस्तकांना न्याय मिळतोय, डोळ्याखालची काळी वर्तुळं जराशी फिकट झाल्यासारखी वाटतायत आणि हलकंहलकं वाटतंय खूप.


थोडंसं लिहायला लागलेय. अनुभवांच्या पोतडीतून बाहेर पडणारे शब्द, समाजमाध्यमावरील मित्र-मैत्रिणींना आपलेसे वाटायला लागले आहेत. अडगळीत पडलेली पेटी आलीये दुरुस्त होऊन आणि स्वर उमटू लागलेत तिच्यातून, मुग्ध करणारे. जणूकाही नवी दृष्टी, नवी दिशा लाभलीये जगण्याला.


घराजवळ असणाऱ्या एका वृद्धाश्रमाशी जोडून घेतलंय मी स्वतःला. तिथल्या आजी आजोबांना पेपर, पुस्तकं वाचून दाखवणं, त्यांना हवं नको बघणं, त्यांच्याशी हितगुज करणं, यात वेळ सत्कारणी लागतोय माझा. सुरवंटाचं फुलपाखरूच झालंय जणू. 


परवाच ऑफिसमधल्या एका मैत्रिणाचा फोन आला होता, पश्चात्ताप झालाय का विचारत होती नोकरी सोडल्याचा… आणि मी हसले खुदकन्, मला नकळत. 


तिला म्हणाले, _“पंचवीस वर्ष जे नव्हतं जमलं, ते मनसोक्त उपभोगतेय मी.”_


तिचं म्हणणं पडलं, _“उगाच सोडलीस नोकरी तू. या संघर्षात जी मजा आहे, काहीतरी मिळवण्याची जी ईर्षा आहे ती गमावलीस. आर्थिक स्वातंत्र्य गमावलंस आणि नको त्या निरर्थक गोष्टीत गुंतून पडलीस उगाचच.”_


विचारात पाडलं तिनं मला, पण खरंच मला नाही वाटलं तसं कधी!


तुम्हाला काय वाटतंय, _‘चुकले मी, की योग्य केलं?’_



*आभार* : पराग गोडबोले

📚 📖 


❇️ *_Share this Katha with everyone_*

➖➖➖➖➖➖

Comments

Popular Posts

दादी माँ ने बताया "भूख बढ़ाने" का नुस्खा।

दादी माँ ने बताया "भूख बढ़ाने" का  नुस्खा। हमारे शरीर की अग्नि खाए गए भोजन को पचाने का काम करती है। यदि यह अग्नि किसी कारण से मंद पड़ जाए तो भोजन ठीक तरह से नही पचता है। भोजन के ठीक से नही पचने के कारण शरीर में कितने ही रोग पैदा हो जाते है। अनियमित खान पान से वायु पित्त और कफ़ दूषित हो जाते है।।जिसकी वजह से भूख लगनी बंद हो जाती है और अजीर्ण अपच वायु विकार तथा पित्त आदि की शिकायतें आने लगती है। Dadi maa ke asardar nuskhe jo bhukh badhate hai, swasthya sudharte hai aur pachan shakti majboot karte hai भूख लगनी बंद हो जाती है, शरीर टूटने लगता है, स्वाद बिगड जाता है। पेट में भारीपन महसूस होने लगता है। पेट खराब होने से दिमाग खराब रहना चालू हो जाता है अथवा समझ लीजिये कि शरीर का पूरा का पूरातंत्र ही खराब हो जाता है। इसके लिये मंन्दाग्नि से हमेशा बचना चाहिए और तकलीफ़ होने पर इन दवाओं का प्रयोग करना चाहिए। भूख नही लगने पर आधा माशा फूला हुआ सुहागा एक कप गुनगुने पानी में दो तीन बार लेने से भूख खुल जाती है। काला नमक चाटने से गैस खारिज होती है, और भूख बढती है। यह नमक पेट को भी साफ़ करता है...

दादी माँ ने बताया "पेट दर्द" का आयुर्वेदिक इलाज

पेट दर्द पेट दर्द" का आयुर्वेदिक इलाज गलत खान पान अथवा अपच के कारण होने वाले पेट दर्द के लिए आयुर्वेद में कुछ नुस्खे बताए गये हैं ! जिनका अगर प्रयोग किया जाए तो पेट दर्द कि परेशानी से बचा जा सकता है ! हालांकि इस तरह के पेट दर्द के लिए आज भी हमारे घरों में आयुर्वेदिक नुस्खे काम में लाये जाते हैं और उनसे आराम भी मिलता है ! ऐसे ही कुछ नुस्खे : - 1 . अदरक और लहसुन को बराबर कि मात्रा में पीसकर एक चम्मच कि मात्रा में पानी के साथ सेवन करने से पेट दर्द में लाभ मिलता है ! 2 . एक ग्राम काला नमक और दो ग्राम अजवायन गर्म पानी के साथ सेवन करने से पेट दर्द में लाभ मिलता है ! 3 . अमरबेल के बीजों को पानी से पीसकर बनाए गये लेप को पेट पर लगाकर कपडे से बाँधने से गैस कि तकलीफ , डकारें आना , अपानवायु न निकलना , पेट दर्द और मरोड़ जैसे कष्ट दूर हो जाते हैं ! 4 . सौंठ , हींग और कालीमिर्च का चूर्ण बराबर कि मात्रा में मिलाकर एक चम्मच कि मात्रा में गर्म पानी के साथ लेने से पेट दर्द में तुरंत आराम मिलता है ! 5 . जटामांसी , सौंठ , आंवला और काला नमक बराबर कि मात्रा में पीस लें और एक एक चम्मच कि मात्रा में तीन ब...

दादी माँ ने बताया "डायबिटीज" का आयुर्वेदिक इलाज

डायबिटीज का आयुर्वेदिक उपचार डायबिटीज अब उम्र, देश व परिस्थिति की सीमाओं को लांघ चुका है। इसके मरीजों का तेजी से बढ़ता आंकड़ा दुनियाभर में चिंता का विषय बन चुका है। जानते हैं कुछ देशी नुस्खे मधुमेह रोगियों के लिए - नीबू: मधुमेह के मरीज को प्यास अधिक लगती है। अतः बार-बार प्यास लगने की अवस्था में नीबू निचोड़कर पीने से प्यास की अधिकता शांत होती है। खीरा: मधुमेह के मरीजों को भूख से थोड़ा कम तथा हल्का भोजन लेने की सलाह दी जाती है। ऐसे में बार-बार भूख महसूस होती है। इस स्थिति में खीरा खाकर भूख मिटाना चाहिए। गाजर-पालक : इन रोगियों को गाजर-पालक का रस मिलाकर पीना चाहिए। इससे आंखों की कमजोरी दूर होती है। शलजम : मधुमेह के रोगी को तरोई, लौकी, परवल, पालक, पपीता आदि का प्रयोग ज्यादा करना चाहिए। शलजम के प्रयोग से भी रक्त में स्थित शर्करा की मात्रा कम होने लगती है। अतः शलजम की सब्जी, पराठे, सलाद आदि चीजें स्वाद बदल-बदलकर ले सकते हैं। जामुन : मधुमेह के उपचार में जामुन एक पारंपरिक औषधि है। जामुन को मधुमेह के रोगी का ही फल कहा जाए तो अतिश्योक्ति नहीं होगी, क्योंकि इसकी गुठली, छाल, रस और गूदा सभी मधुमेह में ...

“माणुसकी – मनाला स्पर्श करणारी कथा”

माणुसकी ➖➖➖➖➖➖➖➖➖ रात्रीचे नऊ वाजलेले पाहून जफरभाईंनी आपल्या पोराला, आसिफला, हाक दिली… “ओ आसिफ… चल गाडीयां अंदर लगा.” आसिफ मित्रासोबत गप्पा मारत होता. मित्राला _ “चल उद्या सकाळी कॉलेजात भेटू” _ म्हणत त्यानं कटवलं व दुरुस्तीला आलेल्या गाड्या आत दुकानात एका बाजूला एक लावू लागला. बारा बाय दहाच्या दुकानात पाच सहा गाड्या बसवायची कसरत रोज करायला लागायची. पण गिर्‍हाइकाच्या  गाड्या बाहेर ठेवून चालणार नाही, हे त्यालाही ठाऊक होतं. त्यात बारीक पाऊस चालू झाला होता. गाड्या लावून होईपर्यंत जफरभाईंनी सगळं सामान आत ठेऊन दिलं. हात धुतले व पोराकडे पाहिलं… त्यांना बरं वाटलं. _ ‘आपण नशीबवान… पोरगं कॉलेज शिकतंय आणि धंद्यात पण आपल्याला मदत करतंय. नाहीतर आपल्या भावांची पोरं… सगळीजण गॅरेजच्या कामात… पण दहावीच्या पुढे एकपण शिकला नाही.’ _ पाऊस आता वाढला होता. अजून वाढण्याआधी घरी पोहोचणं आवश्यक होतं. दुकानाचं शटर ओढून कुलूप लावून जफरभाई वळणार, तोच एक तरुण जोडपं गाडी ढकलत त्यांच्या दरवाज्याशी आलं. बाइकवर आधीच जाऊन बसलेला आसिफ लगेचच म्हणाला, _ “दुकान बंद हुआ भाई…!” _ जफरभाईंनी आसिफकडे फक्त एक कटाक्ष...

हरवलेले सूर

🎵 🎷   हरवलेले सूर ➖➖➖➖   "Sun & Sons" कंपनीच्या सीईओ समीरने आपल्या टीम मेंबर्सना थँक्यू म्हणत मीटिंग संपल्याची घोषणा केली व फाइल वर साइन करून ती पी.एला दिली ....           एवढ्यात इंटरकॉम वरून रिसेप्शनिस्ट बोलली.    "- सर आपल्या करता तीन अर्जंट कॉल....", समीर ने फोन रिसीव केला. चेतन चे तीन रेकॉर्डेड मेसेज होते,   समीर --सावनी  इज  सिरीयस, कम सून. दुसरा होता ----    तिला तुला भेटायचंय.‌‍‌... तिसरा--     बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट...             सावनी  सिरीयस, समीर ला काही कळेच ना, त्यांनी चेतनला कॉल केला, पण फोन लागत नव्हता.          समीरने  पीए ला बोलवून काही सूचना दिल्या...... प्रीती ला मेसेज करून मुंबईला जात असल्याचे कळवले. ड्रायव्हरला मुंबईला चलायचे सांगून समीर मागे बसला. आज मन इतके अशांत होते कि गाडी चालवणे ही धोक्याचे वाटत होते . गाडी स्टार्ट...

सरप्राईज

सरप्राईज देण्यासाठी गेली पण... ➖➖➖➖➖ आज पहील्यांदा अचानक गावी जावून आईबाबांना आश्चर्यचकीत करणार होते. मला त्यांच्या डोळ्यातून ओसंडणारा आनंद पाहायचा होता. तब्बल चार महीन्यानी मी गावी जात होते. 'माझ्या असानमेंट पूर्ण करायच्या आहेत त्यामुळे मला गावी यायला नाही जमत आहे' असे अण्णांना सांगून मी मोबाईल बंद केला आणि मी माझी बॅग भरायला घेतली. हॉस्टेलमध्ये माझ्यासोबत आमच्याच गावातील सरीता असल्यामुळे मला कधीच आई बाबांना आश्चर्यचकीत करता आले नव्हते. पण कालच सरीता तिच्या मामाच्या गावी गेली होती. त्यामुळे हा प्लान मला आखता आला होता. माझ्या मोबाईलवर सरीताचा कॉल आला तेव्हा नाखुशीनेच मी तो उचलला. "हॅलो, बोल गं" "मी पोचले, तुझा काय प्लान आहे, शनिवार रविवारचा?" असे सरीताने विचारल्यावर मी सावध पवित्रा घेतला. "मी नानेघाटच्या ट्रेकला जातेय, नाईट स्टे आहे" मी ट्रेकला जाते म्हटल्याबरोबर तिने तिचे बोलणे आवरते घेतले. "ठीक आहे, बरं झालं मी मामाकडे निघून आले ते. मस्त आराम करायचा सोडून कसले ते डोंगर चढता कोणास ठाऊक?" असे बोलून तिने कॉल कट केला. पिच्छा सुटला...

अजेय : योगी आदित्यनाथ के जीवन की अनकही कहानी

"अजेय" 19 सितंबर 2025 को रिलीज़ हुई फिल्म 'अजेय: एन अनटोल्ड स्टोरी ऑफ योगी' का सरल हिंदी भाषा में रिव्यू पढ़ें। जानें कैसी है मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ की यह बायोपिक, इसकी कहानी, कलाकारों का अभिनय और क्या आपको यह फिल्म देखनी चाहिए??? "अजेय: एन अनटोल्ड स्टोरी ऑफ योगी": योगी आदित्यनाथ के जीवन की अनकही कहानी ​ मुंबई: हाल ही में 19 सितंबर 2025 को रिलीज़ हुई फिल्म "अजेय: एन अनटोल्ड स्टोरी ऑफ योगी" उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ के जीवन पर आधारित एक बायोपिक है। यह फिल्म उनके प्रारंभिक जीवन से लेकर एक प्रभावशाली राजनेता बनने तक के सफर को दर्शाती है। फिल्म का निर्देशन रवींद्र गौतम ने किया है और इसमें मुख्य भूमिका में अनंत जोशी ने योगी आदित्यनाथ का किरदार निभाया है। ​यह फिल्म शांतनु गुप्ता की किताब "द मॉन्क हू बिकेम चीफ मिनिस्टर" से प्रेरित है। फिल्म अजय सिंह बिष्ट के साधारण लड़के से योगी आदित्यनाथ बनने की कहानी को पर्दे पर लाती है, जो उत्तराखंड के एक छोटे से गाँव से निकलकर भारत के सबसे बड़े राज्य के मुख्यमंत्री पद तक पहुँचते है। ...

नवरात्रि 2025

नवरात्रि 2025 ​ शारदीय नवरात्रि 2025 के लिए... "Navratri 9 colors, puja vidhi and fasting rules explained with simple tips to celebrate nine days of devotion and spiritual energy." नौ दिनों के ९ रंग: ​ पहला दिन (माँ शैलपुत्री): सफ़ेद ​यह रंग शांति, पवित्रता और सादगी का प्रतीक है। ​ दूसरा दिन (माँ ब्रह्मचारिणी): लाल ​यह रंग साहस, शक्ति, ऊर्जा और प्रेम को दर्शाता है। ​ तीसरा दिन (माँ चंद्रघंटा): रॉयल ब्लू (शाही नीला) ​यह रंग समृद्धि, शांति और स्थिरता का प्रतीक है। ​ चौथा दिन (माँ कूष्मांडा): पीला ​यह रंग खुशी, चमक और ज्ञान का प्रतीक है। ​ पांचवां दिन (माँ स्कंदमाता): हरा ​यह रंग प्रकृति, विकास और उर्वरता को दर्शाता है। ​ छठा दिन (माँ कात्यायनी): ग्रे (स्लेटी) ​यह रंग बुराई को नष्ट करने की शक्ति का प्रतीक है। ​ सातवां दिन (माँ कालरात्रि): नारंगी ​यह रंग ऊर्जा, उत्साह और सकारात्मकता का प्रतीक है। ​ आठवां दिन (माँ महागौरी): मोरपंखी हरा ​यह रंग विशिष्टता, नवीनता और समृद्धि का प्रतीक है। ​ नौवां दिन (माँ सिद्धिदात्री): गुलाबी ​यह रंग प्रे...

मीराई - फिल्म (Mirai - Super Yodha)

फिल्म रिव्यू: मिराई (Mirai - Super Yodha) ​तेलुगु अभिनेता तेजा सज्जा की फिल्म 'हनु-मान' की शानदार सफलता के बाद, उनकी अगली फिल्म 'मिराई' 12 सितंबर 2025 को सिनेमाघरों में रिलीज़ हुई। यह एक फैंटेसी-एक्शन एडवेंचर फिल्म है, जो प्राचीन भारतीय इतिहास और भविष्य की तकनीक का एक अनूठा मिश्रण प्रस्तुत करती है। ​ कहानी (Plot) ​फिल्म की कहानी अशोक के नौ रहस्मयी रत्नों (Nine Unknown Men) की प्राचीन कथा पर आधारित है। कहानी वेदा (तेजा सज्जा) के इर्द-गिर्द घूमती है, जो एक साधारण युवक है और अपनी रोजी-रोटी के लिए छोटे-मोटे काम करता है। उसकी जिंदगी तब बदल जाती है जब उसे पता चलता है कि वह एक 'सुपर योद्धा' है और उसका भाग्य प्राचीन ग्रंथों की रक्षा करने से जुड़ा है। ​एक दुष्ट शक्ति, जिसे 'ब्लैक स्वॉर्ड' (The Black Sword) कहा जाता है और जिसका नेतृत्व महावीर लामा (मंचू मनोज) कर रहा है, इन नौ पवित्र ग्रंथों को हासिल करना चाहता है ताकि वह दुनिया पर राज कर सके। वेदा को इन ग्रंथों को बचाने और दुनिया को अंधकार से बचाने के लिए अपनी शक्तियों को अपनाना पड़ता है। इस सफर में एक संन्यास...

मराठी माणूस “मागे” का???

मराठी माणूस “मागे” का??? मराठी माणूस “मागे” असण्याची २३ कारणे… आर्थिक सल्लागार मकरंद गाडगीळ यांच्या लेखणीतून… १) कमी प्रवास प्रवास केल्याने जग कळते, कल्पना सुचतात, मार्ग सापडतात व प्रगती होते. मराठी माणूस आर्थिक स्थितीमुळे फारसा प्रवास करताना दिसत नाही, अनेक औद्योगिक प्रदर्शनात मराठी माणूस दिसत नाही. २) अति राजकारण सर्वतजास्त मराठी माणूस राजकारण वेडा आहे. राजकीय नेत्यांच्या सभेला आपला कामधंदा सोडून लाखोंच्या संख्येने येणारा मराठी माणूसच असतो. यात व्यापारी समाजातला एक तरी माणूस दिसतो का? मी काय करतो आहे या पेक्षा लोकांनी काय केले, काय करतात यात जास्त लक्ष. ३) दोनच हात कमावणारे सर्वसाधारण मराठी कुटुंबात एकच व्यक्ती कमवते. कुटुंबातील जास्तीत जास्त लोकांनी काम केले पाहिजे. ४) सर्वांची तोंडे वेगळ्या दिशेला कुटुंबात एकी नसते. बाप एका दिशेला, मोठा मुलगा एका दिशेला तर लहान भाऊ तिसरीकडेच. प्रत्येक कुटूंबात एकी पाहिजे. ५)  खोटं बोल पण रेटून बोल सगळ्या थापा एकमेकांना गंडवण्याच्या गोष्टी, खरे सांगण्यासारखे नसतेच म्हणून खोट बोलावे लागते. मी हे करीन ते करीन या स्वप्नातच आयुष्य संपते, पण मी हे कर...